जमिनीचे गुणधर्म
पृथ्वीच्या 1/3 पृष्ठभाग जमीन व 2/3 पृष्ठभाग पाणी आहे. आज या जमिनीवर 7 अब्ज
संख्येपेक्षा जास्त माणसे राहतात. सर्व मानवांची उपजिवीका जमिनीपासून मिळणाऱ्या
उत्पन्नावरच अवलंबून आहे.
1. जमीन कधीही नष्ट न होणारे उत्पादनाचे सर्वात
महत्त्वाचे साधन आहे.
2. एक जमीन दुसऱ्या जमिनीसारखी कधीही नसते.
3. जमीन व मालमत्तेचा हक्क त्या देशातील कायद्याद्वारे
प्राप्त होतो.
4. जमीन इकडून तिकडे हलवता येत नाही.
5. जमिनीचा ताबा अत्यंत महत्त्वाचा असतो.
दोन देशातील सीमा किंवा हद्द जमिनीवरच निश्चित केली
जाते. सागरी हद्द सुद्धा जमिनीशी संबंधित असते. दोन
व्यक्ती-संस्था यांची मालकी हद्दीद्वारे निश्चित करता
येते.
भारतातील जमिनीची ओळख पुढीलप्रमाणे होते - ती जमीन
कोणत्या देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, गावातील
विभागात आहे. त्या जमिनीचा भूमापन क्रमांक, हिस्सा क्रमांक
या द्वारे होते. जमिनीची मालकी, सीमा किंवा हद्दीमुळे व सीमा
चतु:सीमांप्रमाणे निश्चित होतात. संबंधित शासनाची यंत्रणा जमिनीसंबंधीचे अभिलेख
रेकॉर्ड निर्माण करते, जतन करते, जमिनीचा
मालकी हक्क निश्चित करते.
शासकीय यंत्रणेच्या सकारात्मक हस्तक्षेपाशिवाय
मालमत्तेचे जतन व हक्क संरक्षित करता येत नाही. देशाचे शासन- सरकार देशातील सर्व
जमिनीचे प्रधान-प्रमुख मालक आहे. माणसातील संघर्षाचा ‘जमीन’ हाच प्रमुख विषय आहे.
अंतर व क्षेत्रफळ
10 मिलिमीटर = 1 सें.मी. 12 इंच = 1 फूट
100 सें.मी. = 1 मीटर 3 फूट = 1 यार्ड
1000 मीटर = 1 किलोमीटर 2.54 सें.मी. = 1 इंच
3.28 फूट = 1 मीटर 39.37 इंच = 1 मीटर
1.79 यार्ड = 1 मीटर 1 मैल = 1.60 कि.मी.
1 किलोमीटर = 0.62 मैल 1
यार्ड = 0.91 मीटर
क्षेत्रफळ
144 चौरस इंच = 1 चौरस फूट
10.76 चौरस फूट =
1 चौरस मीटर
100 चौ.मी. = 1 आर
100 आर = 1 हेक्टर
43560 चौ.फू. = 1 एकर
107639 चौ.फू. = 1 हेक्टर
100 हेक्टर = 1 चौरस कि.मी.
1 चौरस कि.मी. = 0.3861 चौ. मैल
0.3861 चौ.मैल = 247.1 एकर
महत्त्वाचे
1089 चौ.फू.
= 1
गुंठा 1076 चौ.फू. = 1 आर
पूर्वी महाराष्ट्रात जमीन चौरस फूट, गुंंठा, एकर याप्रमाणे मोजली जात असे. 1089 चौरस फूटाचा 1 गुंठा, 40
गुंठे = 1
एकर, 43560 चौरस फूटाचा 1 एकर याप्रमाणे भूमी अभिलेखात नोंद केली जाई.
सध्या मेट्रीक दशमान पद्धतीचा उपयोग करून भूमी अभिलेख
लॅन्ड रेकॉर्ड ठेवले जातात.
100 चौ.मी. = 1 आर, 100 आर = 1 हेक्टर याप्रमाणे सध्या जमीन मोजून अभिलेखात
नोंदवली जाते.
न्यायदानाचे कामकाज कोठे चालते
?
1. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली
2. उच्च न्यायालय, (मुंबई,
नागपूर, औरंगाबाद)
3. जिल्हा दिवाणी न्यायालय
4. तालुका दिवाणी न्यायालय