२०१. 'भूमीहीन व्यक्ती' म्हणजे
ज्या व्यक्तीने, शेतीच्या प्रयोजनासाठी मालक म्हणून किंवा कुळ म्हणून
कोणत्याही प्रकारची शेतजमीन धारण केलेली नाही व जी व्यक्ती मुख्यत:
अंगमेहनतीने आपली उपजीविका करते आणि जिचा शेतीचा व्यवसाय करण्याचा हेतू आहे व ती
जमीन कसण्यास समर्थ आहे. (महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ९-अ)
२०२. 'चावडी' म्हणजे
गावाचा महसुली कारभार चालविण्यासाठी तलाठी यांच्याकडून वापरण्यात येणारी
कार्यालयीन जागा. [म.ज.म.अ. कलम २(७)]
२०३. 'निर्वाहक क्षेत्र' म्हणजे
जिरायत जमीन: १६ एकर (वरकस जमीन वगळता) अथवा हंगामात पाणी मिळणारी किंवा भात शेती
जमीन: ८ एकर अथवा बारा महिने पाणी मिळणारी जमीन: ४ एकर.
जर एखाद्याने वरील जमिनींपैकी दोन किंवा अधिक प्रकारची जमीन धारण केली असेल तर, अशा जमिनींचे क्षेत्र कमाल क्षेत्रास लागू असलेल्या निकषांच्या आधारे ठरविण्यात येते. निर्वाहक क्षेत्राची परिगणना करतांना वरकस चमीन वगळण्यात येते. [महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६]
२०४. 'कमाल क्षेत्र' म्हणजे
जिरायत जमीन: ४८ एकर अथवा हंगामात पाणी मिळणारी किंवा भात शेती जमीन: २४ एकर
अथवा बारा महिने पाणी मिळणारी जमीन: १२ एकर.
जर
एखाद्याने वरील जमिनींपैकी दोन किंवा अधिक प्रकारची जमीन धारण केली असेल तर,
अशा
जमिनींचे कमाल क्षेत्र:
¨
बारा महिने पाणी मिळणार्या जमिनीच्या एक एकराबरोबर,
¨
हंगामात पाणी मिळणार्या किंवा भात शेती जमिनीच्या दोन एकराबरोबर,
¨
जिरायत जमिनीच्या चार एकराबरोबर आहे अशा आधारावर ठरविण्यात येते. [महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ५]
२०५. अपील पुनरीक्षण
पुनर्विलोकन तक्ता:
अपील |
पुनरीक्षण |
पुनर्विलोकन |
म.ज.म.अ. कलम-२४७ |
म.ज.म.अ. कलम-२५७ |
म.ज.म.अ. कलम-२५८ |
सुनावणी आवश्यक |
सुनावणी आवश्यक |
सुनावणी आवश्यक |
गुणवत्ता (Merit) नसेल तरीही सर्व मुद्द्यांवर करता येते. |
१. कायदेशीरपणाची खात्री करण्यासाठी. २. औचित्य भंग झाला असेल तर. ३. कार्यपध्दतीबद्दल शंका असेल तर. या तीनच मुद्द्यांवर करता येते. |
१. नवीन महत्वाच्या पुराव्यांचा शोध २. पाहताक्षणी दिसून आलेली चूक ३. इतर पुरेसे कारण या तीन मुद्द्यांवर करता येते. |
पक्षकार दाखल करतो. |
महसूल अधिकारी स्वत:
किंवा अर्जावरून करू शकतात. |
महसूल अधिकारी स्वत:
किंवा अर्जावरून करू शकतात. |
पुनरीक्षण किंवा पुनर्विलोकनात मूळ निर्णय बदलला तर त्याविरूध्द
अपील करता येते. (कलम-२४९ अन्वये) |
पुनरीक्षणाचा अर्ज फेटाळला गेला तर त्याविरूध्द अपील करता येत
नाही. (कलम-२५२ अन्वये) |
पुनर्विलोकनाचा अर्ज फेटाळला गेला तर त्याविरूध्द अपील करता
येत नाही. (कलम-२५२ अन्वये) |
वरिष्ठांकडे चालते. |
वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकार्याकडील कागदपत्रे मागवून करतात. |
ज्याने निर्णय दिला तो अधिकारी करू शकतो. |
वरिष्ठांच्या परवानगीची आवश्यकता नाही. |
वरिष्ठांची पूर्वपरवानगी आवश्यक. |
लेखन प्रमादाशिवाय इतर कारणांसाठी वरिष्ठांची पूर्वपरवानगी आवश्यक. |
मूळ आदेशानंतर ६० दिवसात दाखल करावे. |
ठराविक कालावधी नमूद नाही तथापि,
सर्वोच्च न्यायालयाने काही प्रकरणात निकाल देतांना मूळ आदेशानंतर
३ वर्ष मुदतीत करावे असे नमूद केले आहे. |
मूळ आदेशानंतर ९० दिवसात करावे असे अपेक्षित आहे. परंतू बंधनकारक नाही. |
२०६. गाव नमुने तक्ता
क्षेत्र आणि जमीन महसूल यासंबंधीचे महसुली लेख (गाव नमुने १ ते ५)
|