अमुक दस्‍त हजर करवून घेऊन फेरनोंद करावी, सबब नोंद रद्‍द' असा शेरा प्रमाणन अधिकार्‍याने लिहिणे योग्‍य आहे काय?

प्रश्‍न :-

'अमुक दस्‍त हजर करवून घेऊन फेरनोंद करावी, सबब नोंद रद्‍द' असा शेरा प्रमाणन अधिकार्‍याने लिहिणे योग्‍य आहे काय?

उत्तर :-

प्रमाणन अधिकार्‍यास फेरफार नोंद एकतर प्रमाणित करता येते किंवा रद्‍द करता येते. फेरनोंद करण्‍याचा आदेश देणे बेकायदेशीर आहे.

फेरनोंद घेण्‍याच्‍या तरतुदीबाबत कायद्‍यात कुठेही उल्‍लेख नाही. फेरफार प्रकरणात एखादा दस्‍त कमी असल्‍यास, तो सादर करर्‍यासाठी मुदत द्‍यावी. जरुर तर तसा उल्‍लेख शेरा स्‍तंभात करावा.

अशा नोंदीबाबत तात्‍काळ निर्णय घेणे अत्‍यावश्‍यक असल्‍यास ती नोंद कागदपत्र अपूर्ण असल्‍यामुळे रद्‍द करावी आणि संबंधिताला त्‍याबाबत सक्षम अधिकार्‍याकडे अपिल दाखल करण्‍याचा सल्‍ला द्‍यावा.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

إرسال تعليق